आजवर भेटी दिलेले प्रेक्षक

Showing posts with label निसर्ग. Show all posts
Showing posts with label निसर्ग. Show all posts

स्मरणोदक...


असं म्हणतात की पाणी आठवणी जपुन ठेवतं...

कधीकाळी त्या खळाळणाऱ्या ओढ्याकाठी आपण घालवलेले ते क्षण;
नाना विषयांवर आपण मारलेल्या गप्पा,
अगदी गावातल्या त्या अल्लड प्रेमीयुगुलां पासून ते ऍलॉनच्या स्पेस-एक्सच्या मिशन पर्यंत...
मिश्कीलपणे एकमेकांना विचारलेले प्रश्न;
आणि तेवढ्याच खट्याळपणे दिलेली उत्तरे अन् अगदी निरागसपणे एकमेकांना दिलेली अतूट वचने...

त्याच आठवणी ओढ्यासोबत पुढे वाहत वाहत नदीला जाऊन मिळाल्या असतील,
आणि नदी पुढे जाऊन समुद्राला...
नंतरच्या असह्य उन्हाळ्यात त्याच आठवणी बाष्पीभूत होऊन;
हळूवारपणे तरंगत आकाशाला भिडल्या असतील...
अन् पुढे मोसमी वाऱ्याच्या थंडाव्याने त्यांना पुन्हा द्रवरुप प्रदान केले असेल...
त्याच वाहणाऱ्या वाऱ्यासोबत प्रवास करत करत हे गच्च भरलेले ढग आज माझ्या दाराशी येऊन रीते होत आहेत... आणि मी मात्र अगदी तुडुंब भरून गेलो आहे...
इथुन पुढे त्यांना ना प्रवाहीत होण्यास जागा आहे ना रिते होण्यास तु...
या जलचक्राप्रमाणे हे आठवणींच चक्रही असंच फिरत राहील हळुहळू
आणि इथेच निर्माण होईल एक विशालकाय जलाशय...

अन् मीही एखाद्या गोतेखोरा प्रमाणे एकटाच या अथांग सरोवरात शोधत राहीन तुझ्या आठवणीचा एक एक मोती....

असं म्हणतात की पाणी आठवणी जपुन ठेवतं...

-कवी-

-प्रदिप काळे

--------------------

व्हिडीओ सादरीकरण - 

प्रदिप काळे

Insta ID - @pradipkale1996 & @_mukt_kalandar_

---------------------

All Rights reserved.©

muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©

या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

पहाट धुके २

नमस्कार.या ब्लाॅग वरती हि माझी दुसरी कविता. माझ्या पहिल्या कवितेचे नाव देखील पहाट धुके हेच होतं. दोन्ही कवितां मधे काहीही फरक नाही. फक्त शब्दरचनेत बदल आहे. फरकच नाही तर मग हि कविता लिहली कशासाठी असेहि वाटु शकते. तर निसर्गाचे अनेक अवतार आहेत, कधी शांत वाटनारा निसर्ग अचानक रौद्र रूप घेतो तर कधी इतका रम्य वाटतो की आपण याच्या प्रेमात पडतो. आणि अशा रम्य क्षणांच कितीही वर्णन केले तरी कमीच आहे. पहाटेची वेळ ही अशाच क्षणाच उदाहरण. शांत वारा, बोचरी थंडी आणि धुक्याची चादर खुपच सुंदर दृश्य, त्याच कितीही कौतुक केलं तरी कमीच आहे. अलीकडे असे क्षण खुपच कमी अनुभवायला मिळतात, आणि तेच क्षण जर शब्दांमध्ये गुंफुन कविता केली तर ती वाचताना जो एक फिल येतो ना, की स्वत: तो क्षण अनुभवल्या सारखे वाटते. पुर्वी चौथीच्या अभ्यासक्रमात भा.रा.तांबेंची "सायंकाळची शोभा" या नावाची एक कविता होती,
"पिवळे तांबुस ऊन कोवळे पसरे चौफेर
ओढा नेई सोने वाटे वाहुनिया दुर"
या कवितेत सायंकाळच्या प्रसंगाच खुपच सुंदर वर्णन आहे. तशीच दामोदर अच्युत कारे यांची "झुळुक" ही कविता. या कविता आजही लक्षात राहतात. त्या वाचताना एक वेगळीच मजा येते. या कवितांपुढे माझी ही कविता म्हणजे काहीच नाही. तरीही ते क्षण टिपण्याचा हा एक प्रयत्न. हि कविता या पुर्वी मिसळपाव.काॅम इथे प्रकाशित झाली आहे.
धन्यवाद.
________________________________________________________
पहाट धुके २

धुंद सकाळी काढत वाट
चालत होतो धुक्यात
गर्द धुके हे जणु उतरले 
आकाशीचे नभ वनात


शुभ्र धुक्याचे जाळे पसरले
मोहुनी गेली पहाट
पाहण्या हा सोहळा धुक्याचा 
पाखरांची गर्दी दाट


किलबील किलबील गाऊ लागली
पाखरे मिळुनी सुरात
वनराईच्या देखाव्याने
भुलुनी गेलो सुखात


दवबिंदुच्या अोलाव्याने
भिजुनी गेली पहाट
किती नयनरम्य हा 
दिसे निसर्गाचा थाट


दाट धुक्यातुन शोधीत आली
सुर्यकिरण हीे आपुली वाट
आनंदाची सकाळ घेऊन 
आली धुक्याची पहाट.

      -मुक्त कलंदर© (प्रदिप काळे).
___________________________________________
All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सहदेव-भाडळी : शकुनांचा अद्भुत वारसा

( डिस्क्लेमर  : प्रस्तुत लेखाचा उद्देश हा समाजामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रध्दा पसरवण्याचा वा कुणाच्याही भावना दुखविण्याचा नाहीये. त्या...

Copyright©

All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.


Copyrighted.com Registered & Protected