असं म्हणतात की पाणी आठवणी जपुन ठेवतं...
कधीकाळी त्या खळाळणाऱ्या ओढ्याकाठी आपण घालवलेले ते क्षण;
मिश्कीलपणे एकमेकांना विचारलेले प्रश्न;
त्याच आठवणी ओढ्यासोबत पुढे वाहत वाहत नदीला जाऊन मिळाल्या असतील,
नंतरच्या असह्य उन्हाळ्यात त्याच आठवणी बाष्पीभूत होऊन;
अन् पुढे मोसमी वाऱ्याच्या थंडाव्याने त्यांना पुन्हा द्रवरुप प्रदान केले असेल...
त्याच वाहणाऱ्या वाऱ्यासोबत प्रवास करत करत हे गच्च भरलेले ढग आज माझ्या दाराशी येऊन रीते होत आहेत... आणि मी मात्र अगदी तुडुंब भरून गेलो आहे...
इथुन पुढे त्यांना ना प्रवाहीत होण्यास जागा आहे ना रिते होण्यास तु...
अन् मीही एखाद्या गोतेखोरा प्रमाणे एकटाच या अथांग सरोवरात शोधत राहीन तुझ्या आठवणीचा एक एक मोती....
असं म्हणतात की पाणी आठवणी जपुन ठेवतं...
-कवी-
-प्रदिप काळे
--------------------
व्हिडीओ सादरीकरण -
प्रदिप काळे
Insta ID - @pradipkale1996 & @_mukt_kalandar_
---------------------
All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.
