आजवर भेटी दिलेले प्रेक्षक

Showing posts with label पंढरपूर. Show all posts
Showing posts with label पंढरपूर. Show all posts

स्मरणोदक...


असं म्हणतात की पाणी आठवणी जपुन ठेवतं...

कधीकाळी त्या खळाळणाऱ्या ओढ्याकाठी आपण घालवलेले ते क्षण;
नाना विषयांवर आपण मारलेल्या गप्पा,
अगदी गावातल्या त्या अल्लड प्रेमीयुगुलां पासून ते ऍलॉनच्या स्पेस-एक्सच्या मिशन पर्यंत...
मिश्कीलपणे एकमेकांना विचारलेले प्रश्न;
आणि तेवढ्याच खट्याळपणे दिलेली उत्तरे अन् अगदी निरागसपणे एकमेकांना दिलेली अतूट वचने...

त्याच आठवणी ओढ्यासोबत पुढे वाहत वाहत नदीला जाऊन मिळाल्या असतील,
आणि नदी पुढे जाऊन समुद्राला...
नंतरच्या असह्य उन्हाळ्यात त्याच आठवणी बाष्पीभूत होऊन;
हळूवारपणे तरंगत आकाशाला भिडल्या असतील...
अन् पुढे मोसमी वाऱ्याच्या थंडाव्याने त्यांना पुन्हा द्रवरुप प्रदान केले असेल...
त्याच वाहणाऱ्या वाऱ्यासोबत प्रवास करत करत हे गच्च भरलेले ढग आज माझ्या दाराशी येऊन रीते होत आहेत... आणि मी मात्र अगदी तुडुंब भरून गेलो आहे...
इथुन पुढे त्यांना ना प्रवाहीत होण्यास जागा आहे ना रिते होण्यास तु...
या जलचक्राप्रमाणे हे आठवणींच चक्रही असंच फिरत राहील हळुहळू
आणि इथेच निर्माण होईल एक विशालकाय जलाशय...

अन् मीही एखाद्या गोतेखोरा प्रमाणे एकटाच या अथांग सरोवरात शोधत राहीन तुझ्या आठवणीचा एक एक मोती....

असं म्हणतात की पाणी आठवणी जपुन ठेवतं...

-कवी-

-प्रदिप काळे

--------------------

व्हिडीओ सादरीकरण - 

प्रदिप काळे

Insta ID - @pradipkale1996 & @_mukt_kalandar_

---------------------

All Rights reserved.©

muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©

या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.

ओढ मातीची... ओढ आपल्या माणसांची...

------------- 


--------------

मला गावं सुटंना...


आठवडा भराची रजा टाकून गावाकडं आलं की पहिले काही दिवस खुप मजेत जातात,


परंतू जस-जसं परत निघायची वेळ जवळ येते तस-तसं मनात एक वेगळीच भावना तयार होते, की जी शब्दातून व्यक्त करताच येत नाही‌. ती फक्त जाणवत राहते आतून...


मग असं एकटं बसलं की आठवायला लागतात 


त्या ठिकाणी आपण व्यतीत केलेले क्षण... 


मनाच्या खोल तळाशी‌ हळूहळू एकेक प्रसंग उभारुन येऊ लागतात....


उगाच कुणाशीही न बोलता शांत पडून रहावं वाटतं... शून्यात बघणं काय असतं ते याक्षणी जाणवतं. 


वरुन स्थिर वाटणाऱ्या मनाचा तळ मात्र असंख्य आठवणींनी ढवळून निघालेला असतो. ज्याच्या पुसट छटा वरती जाणवल्याशिवाय राहत नाहीतंच, मग आपली इच्छा नसूनही घरी सगळ्यांच्या नजरेत ते आल्याशिवाय राहत नाही, आणि मग ते  विचारतातच,


 " असा का बसला आहेस? कुणाशी बोलत नाहीस की काही नाही? काय झालंय? "


पण काय सांगणार , जे स्वतःलाच कळत नाही ते त्यांना तरी कसं सांगायचं. 


खरंतर त्यांनाही कळलेलं असतंच, पण आपल्याला अजून त्रास होईल म्हणून ते फक्त कुणी तसं बोलून दाखवंत नाही. कारण त्यांनाही ठाऊक असतं की दुसरा पर्याय नाही.


पण एक मात्र खरं घरुन पाय काही निघंत नाही, आणि तिथून निघाल्याशिवाय पर्यायच नसतो. 


नोकरी करणारांच्या (किंवा चाकरमान्यांच्या) आयुष्यातल हे अटळ सत्य की आपलं घर, आपला गाव ,आपली माणसं, आपली माती काही केल्या सुटत नाही, पण याच घरासाठी ते सोडून तिथून दूर रहावं लागतं...


पण एक मात्र खरं की, जाताना आपण एक नवी उर्जा, नवी उमेद घेऊन निघतो की जी पुन्हा परत येईपर्यंत टिकून राहते. आणि सोबत असतं नवीन आठवणींच गाठोडं जे क्षणोक्षणी इथली आठवण देत राहतं.... आणि पुन्हा परतण्याची आशा जागवत ठेवतं...


- प्रदिप काळे ( मुक्त कलंदर ).

Pradip Kale - Instagram

मुक्त कलंदर - Instagram

 मुक्त कलंदर - FB


#माझं_गाव #वाडीकुरोली #पंढरपुर #गावच्या_आठवणी #my_village #wadikuroli #pandharpur #village_memmories #sunset #sunset_in_village #village_life🌴🌳🏕️🏡 #mukt_kalandar

__________

Background songs credit - Song from Marathi Movie - Boys 4 



वैशिष्ट्यीकृत पोस्ट

सहदेव-भाडळी : शकुनांचा अद्भुत वारसा

( डिस्क्लेमर  : प्रस्तुत लेखाचा उद्देश हा समाजामध्ये कोणत्याही प्रकारची अंधश्रध्दा पसरवण्याचा वा कुणाच्याही भावना दुखविण्याचा नाहीये. त्या...

Copyright©

All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
या ब्लॉगवरील कोणतेही लेखन अथवा लेखनाचा भाग इतरत्र प्रकाशित करण्यापुर्वी लेखकाची परवानगी आवश्यक आहे.


Copyrighted.com Registered & Protected