संध्याकाळची वेळ होती,
मन एकदम उदास होतं
कशामुळे कशासाठी, काही माहीत नव्हतं
मन एकदम उदास होतं
कशामुळे कशासाठी, काही माहीत नव्हतं
अशा या क्षणी काय करावे, कुठे जावे,
काही समजत नव्हते
मन उदासवाणे इकडुन तिकडे, फक्त भटकत होतं
काही समजत नव्हते
मन उदासवाणे इकडुन तिकडे, फक्त भटकत होतं
विचारांच्या गर्दी पासुन दुर,
शांत ठिकाणी हरवत होतं
जणु मनाच्या या नगरीत , सुतकच पडलं होतं
शांत ठिकाणी हरवत होतं
जणु मनाच्या या नगरीत , सुतकच पडलं होतं
जसजसा दिवस सरत होता,
तस तस मन अजुनच भरकटत होतं
ना बोलण्यात, ना एेकण्यात, कशातच मन लागत नव्हतं
तस तस मन अजुनच भरकटत होतं
ना बोलण्यात, ना एेकण्यात, कशातच मन लागत नव्हतं
विचारांपासुन दुर जावुन,
जणु विचार करणच सोडल होतं
का नि कशासाठी, काही समजत नव्हत
जणु विचार करणच सोडल होतं
का नि कशासाठी, काही समजत नव्हत
ना राग येत होता ना हसणं,
मन एकदम निश्चल दगडा प्रमाणे भासत होत
जगापासुन दुर कुठेतरी, आपल्याच नादात होतं
मन एकदम निश्चल दगडा प्रमाणे भासत होत
जगापासुन दुर कुठेतरी, आपल्याच नादात होतं
रात्री गडद अंधारात,
हळु हळु बुडुन जात होतं
कशामुळे कशासाठी, काही माहीत नव्हतं.
हळु हळु बुडुन जात होतं
कशामुळे कशासाठी, काही माहीत नव्हतं.
-मुक्त कलंदर© (प्रदिप काळे).
_________________________________________________________________
All Rights reserved.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
muktkalandar.blogspot.com वरील सर्व हक्क राखिव आहेत.©
No comments:
Post a Comment